November 1, 2025

होंडा कंपनीतर्फे सांगलीतील विद्यार्थ्यांनां रस्ता सुरक्षेचे धडे

0
IMG-20250720-WA0094

सांगली-देशात दोन चाकी वाहनांच्या वापरामुळे वाहतुकीचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा शिक्षण पूर्वीपेक्षा अधिक गरजेचे बनले आहे. होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया ने आपल्या देशव्यापी रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत सांगलीमधील श्री ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल आणि झील इंटरनॅशनल स्कूल मध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला. या उपक्रमात २२०० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शाळा कर्मचारी सहभागी झाले आणि जबाबदार रस्ता वापरकर्ते बनण्याची प्रेरणा घेतली.
या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे सिद्धांत, संवादात्मक चर्चा, आणि स्थिर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयींबाबत जागरूक केले गेले. हेल्मेट वापर, परिस्थितीचे भान ठेवणे आणि तात्काळ निर्णय घेण्यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी फक्त माहिती ग्रहण न करता, सक्रिय सहभाग घेतला आणि वैयक्तिक जबाबदारीचा विचार करण्यास प्रवृत्त झाले.
होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया चे प्रशिक्षित मार्गदर्शक हे अभियान पुढे नेत होते. त्यांनी रस्ता सुरक्षेला केवळ नियमांचे पालन न मानता, एक सकारात्मक मानसिकता म्हणून समजावून सांगितले. हा उपक्रम देशभरातील विविध शाळांमध्ये राबवला जात आहे आणि भारतातील पुढच्या पिढीमध्ये रस्ते सुरक्षिततेची संस्कृती रुजवण्याचा हेतू त्यामागे आहे.
सांगलीचे विद्यार्थी आणि युवक होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया च्या या विस्तृत मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत – एक-एक जबाबदार निर्णय घेऊन ते सुरक्षित प्रवासासाठी समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत
उद्देश साध्य करण्यासाठी मुलांमध्ये लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेबद्दलची योग्य मानसिकता तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधून रस्ता सुरक्षा शिकवणं हे फक्त माहिती देण्यापुरतं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेची संस्कृती तयार करणं हे खरे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे हे विद्यार्थी भविष्यात जबाबदार नागरिक बनून रस्ता सुरक्षेचे प्रतिनिधी बनू शकतात आणि सुरक्षित समाज घडवू शकतात.
ही संकल्पना दीर्घकालीन उपक्रमाचा एक भाग असून, यामध्ये मुलं, शिक्षक, आणि डीलर्स यांना रस्ता सुरक्षिततेसाठी सजग बनवण्याचं उद्दिष्ट आहे. पुढील टप्प्यात, हे व्यासपीठ भारतातील प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये पोहोचवण्याची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page